भक्ती, समाजप्रबोधन आणि कर्मवीर विचारांचा प्रभावी संगम
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात धार्मिकतेसोबतच समाजप्रबोधनाचा प्रभावी संगम पाहायला मिळत आहे. कीर्तन, प्रवचन आणि व्याख्यानांच्या माध्यमातून अध्यात्म आणि सामाजिक जाणीवा यांची सुंदर उकल केली जात आहे.

🎓 प्रेरणादायी व्याख्यान : “कर्मवीर झालासे कळस”
या सप्ताहात प्रा. श्री . रेवण काशिनाथ चव्हाण यांनी “कर्मवीर झालासे कळस” या विषयावर अत्यंत सखोल आणि विचारप्रवर्तक व्याख्यान दिले.
व्याख्यानात त्यांनी महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीचा आढावा घेत शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा पाया रचला.
राजर्षी शाहू महाराज यांनी समतेची अंमलबजावणी घडवून आणली.
आणि या पायावर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचा भव्य कळस उभारला.
प्रा. चव्हाण यांनी पुढे स्पष्ट केले की—
✔ शिक्षण हे केवळ पुस्तकी नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे
✔ ग्रामीण व वंचित घटकांपर्यंत ज्ञान पोहोचवणे ही खरी सेवा आहे
✔ रयत शिक्षण संस्था मार्फत “कमवा आणि शिका” योजनेने विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन व श्रमसंस्कार रुजवले
✔ समता, मानवता आणि आत्मनिर्भरता हेच शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे
“मला शाळा उघडायच्या आहेत; माणसं घडवायची आहेत,”
हा कर्मवीरांचा ध्यास आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच त्यांच्या तत्वनिष्ठतेचा आदर्श सांगताना कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचा संदेश दिला.
शेवटी त्यांनी उपस्थितांना आवाहन केले—
जोतिरावे रचिला पाया, कर्मवीर झालासे कळस;
आपण सर्वांनी हा विचारांचा वारसा जपला पाहिजे.”

🎤 पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी हरिभक्त परायण श्याम महाराज भोसले (कवठे, सोलापूर) यांनी
समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो” या अभंगावर अत्यंत भावपूर्ण कीर्तन सेवा सादर केली.
या कीर्तनातून त्यांनी जीवनाचा गाभा स्पष्ट करत सांगितले—
कृतीशिवाय प्रपंच नाही, तर वृत्तीशिवाय परमार्थ होऊ शकत नाही.”
संसार यशस्वी करण्यासाठी जशी कृती आवश्यक आहे, तसेच परमार्थासाठी मनाची शुद्ध वृत्ती आवश्यक आहे. मन, विचार आणि आचरण भगवंताच्या चरणी अर्पण केल्याशिवाय खरा आध्यात्मिक आनंद मिळत नाही, हा संदेश त्यांनी प्रभावीपणे दिला.

अन्नदान सेवा

सकाळी नाष्टा श्री भास्कर पंढरीनाथ सुरवसे यांच्याकडून तर दुपारचे अन्नदान श्री मधुकर विश्वनाथ कदम श्री गोरख आबा कदम यांच्याकडून तसेच  रात्रीचे अन्नदान श्री रमेश दादा शंकर रोकडे व श्री कुमार बलभीम चव्हाण यांच्या वतीने होते.

सुस्ते येथील हा अखंड हरिनाम सप्ताह केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजप्रबोधनाचा प्रभावी उपक्रम ठरत आहे.
कीर्तनातून अध्यात्म आणि व्याख्यानातून विचार यांचा सुंदर संगम घडत असून, हा सप्ताह भाविकांसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरत आहे.

🙏 परंपरेची प्रेरणा आणि मार्गदर्शन
हा अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी हरिभक्ती परायण दिनकर काका बोधले महाराज यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आला आहे.
सप्ताहाला संत माणकोजी बोधले महाराज यांच्या आशीर्वादाची जोड लाभली आहे. तसेच श्री गुरु प्रभाकर दादा बोधले महाराज आणि डॉ. जयवंत महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा भक्तिमय वातावरणात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Exit mobile version